Sunday, June 28, 2009

अकलूजला पार पडलं तिसरं गोल रिंगण


अकलूजला पार पडलं तिसरं गोल रिंगण


संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं तिसरं रिंगण आज पार पडलं। अकलूज - इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या आवारात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं तिसरं आणि शेवटचं गोल रिंगण आज (ता.२८) पार पडलं. तत्पूर्वी, जिल्ह्याचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सपत्निक आणि सरपंच संग्रामसिंह मोहिते यांनी अकलूजमध्ये स्वागत केलं. संपूर्ण पालखी सोहळ्यातलं आखीव, रेखीव आणि नेटकं व्यवस्थापन असणारं हे गोल रिंगण पाहण्यासाठी राज्यातून अनेक भाविक, अभ्यासक, आवर्जून उपस्थित राहतात. या गोल रिंगणानंतर होणारे संत खेळ खेळण्यात आणि पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. टाळकरी, पखवाजवादक आदी भाविक तसंच डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी चोपदारांच्या सुचनेनुसार तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्याचवेळी अचानक मोहिते पाटील यांचा आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा अश्व रिंगण तोडून बाहेर पडले. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय अन्य तीन ते चार वारकरी किरकोळ जखमी झाले. भक्तनिवासासाठी एक कोटीदेहूतल्या भक्तनिवासासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज इथं केली. त्यासाठीची प्रक्रिया १५ दिवसांत सुरु करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

डोणजे रेव्ह पार्टीतील २१ जणांची मुक्तता

डोणजे रेव्ह पार्टीतील २१ जणांची मुक्तता
पुणे - सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावाजवळ झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या २८० युवक-युवतींपैकी २१ जणांची अमली पदार्थ द्रव्यसेवन केल्याच्या आरोपातून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. भागवत यांनी मंगळवारी मुक्तता केली; मात्र सार्वजनिक ठिकाणी बीभत्स वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर कायम ठेवण्यात आला आहे. डोणजे गावाजवळ चार मार्च २००७ रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा पोलिसांनी छापा घालून २८० युवक-युवतींना अटक केली होती. त्या वेळी घटनास्थळी अमली पदार्थांचा मोठा साठा सापडला होता. पकडण्यात आलेल्या सर्वांची सखोल वैद्यकीय तपासणी तपासणी झाली होती. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून या चाचणीचा अंशतः अहवाल न्यायालयात नुकताच दाखल झाला. त्यात २१ जणांनी सेवन केले नव्हते, असे म्हटले आहे. त्याच्या आधारे सेवनाच्या आरोपातून मुक्तता करावी, असा अर्ज २१ जणांच्या वतीने ऍड. सुरेशचंद्र भोसले, ऍड. श्रीकांत शिवदे, ऍड. मिलिंद पवार, ऍड. प्रसाद कुलकर्णी आदींनी केला होता.
वाचकांच्या प्रतिक्रिया


On June 24th 6:06 PM, anand bapat said:
All the people should unite and outcast all the concerned police officials, advocates/lawyers and the lab people. No body should attend any social event at their home and do not invite them to your places. Remember Baba Bhide and Manju Sarda case?

On June 24th 5:06 PM, shivanand said:
how much people earns to give such report need to find out

On June 24th 5:06 PM, sachin said:
if it was in malaysia or any other middle-eastern country then they would have been hanged to death in 2007 itself.

On June 24th 5:06 PM, s said:
please ek party madhi group photo patva...live patry madhil bhetla tar aati uutam....... jai ho

On June 24th 4:06 PM, abcd said:
atta hya 21 janata sagali badyanchi mule sutali asnar, report kay kasahi tayar karun milato halli.

On June 24th 3:06 PM, Deepak said:
डोणजे गावाजवळ चार मार्च २००७ रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा पोलिसांनी छापा घालून २८० युवक-युवतींना अटक केली होती. त्या वेळी घटनास्थळी अमली पदार्थांचा मोठा साठा सापडला होता. Ha satha gamantisathi thevala votha, knonihi tycha wapar kelela disat nahi. Good, Very good,

On June 24th 12:06 PM, veryharsh said:
चार मार्च २००७ la ghadaleli ghatana aani न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून या चाचणीचा अंशतः अहवाल न्यायालयात नुकताच दाखल झाला. itke diwas ऍड. सुरेशचंद्र भोसले, ऍड. श्रीकांत शिवदे, ऍड. मिलिंद पवार, ऍड. प्रसाद कुलकर्णी hyana sagle manage karnyasathi laagala ka? hats offffff to india.

On June 24th 11:06 AM, Vilas said:
Another new" Police javal 20 gr GANJA sapadala... tyala kadhun takale.... MONEY MATTERs.... if you want to do wrong thing ... first earn huge money... they u can do whatever u want..... GREAT INDIA...

On June 24th 10:06 AM, Rajendra Jadhav said:
Jai ho

On June 24th 10:06 AM, Rajendra Jadhav said:
Prasang ahe March 2007 madhala, chachanicha "anshatha" ahaval nukatach dakhal jhaala. Ya kartabagarisathi kunkunache kautuk karayche. Kharach Bharat ek Superpower aahe.

On June 24th 3:06 AM, sabu said:
Ye To Hona Hi Tha!

वरवंड (ता. दौंड) - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मुक्कामाच्या ठिकाणी आरतीसाठी जमलेला वैष्णवांचा मेळा. (छायाचित्र - रमेश वत्रे)

तुकोबारायांची पालखी वरवंडला

तुकोबारायांची पालखी वरवंडला
राजेंद्रकृष्ण कापसे
वरवंड (ता. दौंड) - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मुक्कामाच्या ठिकाणी आरतीसाठी जमलेला वैष्णवांचा मेळा. (छायाचित्र - रमेश वत्रे)
वरवंड - समाजआरतीला "ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष, त्याला टाळ-मृदंगांची साथ अन्‌ तुकोबांचा रथ येताच टिपेला पोचलेला गजर... अशा भक्तिरंगात चिंब झालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी साडेसहा वाजता वरवंड येथे विसावला. शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे जमीन ओली झाली होती. त्यामुळे जिल्हा प रिषद व विद्या विकास मंदिरातील व्हरांड्याचा वारकऱ्यांना आसरा मिळाला. पहाटे महावीर परिवार व कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सपत्नीक पादुकांची पूजा केली. या वेळी विश्‍वस्त विश्‍वजित मोरे उपस्थित होते. सकाळी सहा वाजता सोहळा मार्गस्थ झाला. भां डगाव येथे दुपारच्या विसाव्यासाठी सोहळा सकाळी अकराच्या सुमारास पोचला. गावकऱ्यांनी पालखी रथातून खांद्यावर घेतली आणि रोकडोबानाथ मंदिरात विसाव्यासाठी ठेवली. गोपाळ यांनी महानैवेद्य दाखविला. त्यानंतर वारकरी व भाविकांना पिठले-भाकरीचा प्रसाद देण्यात आला. भांडगावहून दुपारी एक वाजता सोहळा मार्गस्थ झाला. चौफुला येथील विसाव्यासाठी सोहळ्याचे आगमन साडेतीन वाजता झाले. या वेळी अध्यक्ष सोनबा मोरे, सूर्यकांत मोरे, संजय मोरे, राजेंद्र मोरे तुकोबांच्या रथाचे सारथ्य करीत होते. शिरूर-सातारा रस्त्यावरील २५ गावांतील भाविक दर्शनासाठी आले होते. सव्वाचारच्या सुमारास जोरदार पाऊस आला. त्यामुळे वारकऱ्यांनी दुकाने, घरे, वाहनांचा आसरा घेतला. अनेकांना उभे राहूनच विसावा घ्यावा लागला. पाऊस सुरू असतानाच साडेचार वाजता सोहळा मार्गस्थ झाला. चौफुला येथील तमाशा कला केंद्राच्या कलाकारांनी अन्नदान केले. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सोहळा वरवंड गावाजवळ पोचला. गावातील विठ्ठल-रुक्‍मिणी मं दिरासमोर दिंडीतील पताका, टाळकरी, विणेकरी, पखवाज वादक अर्धवर्तुळाकार उभे रा हिले. ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष सुरू झाला. टाळकऱ्यांनी मृदंगाच्या स्वरावर ताल धरला. त्यानंतर चोपदारांनी चोप उंचावून समाजआरती घेतली. सोमवारी सकाळी रोटी घाटमार्गे पालखी दौंड तालुक्‍यातून बारामती तालुक्‍यात प्रवेश करणार आहे.

तुकोबांची पालखी लोणी काळभोरला विसावली

तुकोबांची पालखी लोणी काळभोरला विसावली
राजेंद्रकृष्ण कापसे लोणी काळभोर - रस्त्याच्या दुतर्फा विविध फुलांचे ताटवे; त्यातच पावसाची हजेरी...अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी लोणी काळभोरमध्ये रात्री पावणे आठ वाजता विसावला।शुक्रवारी योगिनी एकादशी असल्याने सर्व भाविकांचा उपवास असतो. वारीतील एकादशी जास्तीत जास्त शुद्ध आचारणाने करीत वारकऱ्यांची वाटचाल सुरू होती. पहाटे साडेपाच वाजता विश्‍वस्त सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाली. शहरातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून शुक्रवारी सकाळी सहा वाजता सोहळा पुढे मार्गस्थ झाला. काकड आरतीच्या अभंगांनी पुणेकरांना जागे करीत भैरोबा नाला येथे पहिल्या विश्रांतीसाठी सोहळा नऊ वाजता पोचला. एकादशीमुळे सकाळपासूनच रस्त्याच्या दुतर्फा अनेक जण केळी, शेंगदाणे, राजगिरा लाडू, चिवडा अशा उपवासाच्या पदार्थांचे वाटप वारकऱ्यांना करत होते. पालख्यांचा मुक्काम दुपारी हडपसर येथे होता. तेथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ऊन्ह-सावल्यांच्या खेळ रंगलेला असतानाच सोहळा सोलापूर महामार्गाने पुढे मार्गस्थ झाला. मांजरी फाटा, मांजरी येथे दर्शनासाठी अनेक भाविक रस्त्याच्या कडेला थांबलेले होते. मांजरी फार्म येथे हवेली तालुक्‍याच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. सभापती प्रभावती भूमकर, उपसभापती बंडू खांदवे, गटविकास अधिकारी विक्रांत बगाडे, सदस्या भारती शिक्रे या वेळी उपस्थित होत्या. सर्व वारकऱ्यांना राजगिऱ्याच्या लाडवांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक दिंडीतील वीणेकऱ्याला उपरणे, तसेच औषधाचे "किट' वाटण्यात आले. या "किट'मध्ये अंगदुखी, ताप, थंडी यांच्या गोळ्या आहेत. पिंपरी-चिंचवडकरांचे, पुणेकरांचे आदरातिथ्य घेऊन सोहळा हडपसरनंतर ग्रामीण भागात वाटचाल करू लागला. काळीभोर जमीन, हिरवीगार शेती असा परिसर सुरू झाला. द्राक्षे, ऊस, केळी, भाजीपाला, हरितगृहातील फुलशेती असे या परिसरातील चित्र आहे. त्यातच पावसाचा शिडकावा आल्याने वातावरण अधिकच उत्साही बनले. सायंकाळी पावणेआठ वाजता समाज आरती झाल्यानंतर सोहळा मुक्कामी विसावला. शुक्रवारी रात्री केसापुरीकरांचे कीर्तन झाले. शनिवारी सकाळी सहा वाजता देहूकरांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर आठ वाजता सोहळा यवतच्या दिशेने मार्गस्थ होईल.

पालखीचे उद्योगनगरीत उत्साहात स्वागत

पालखीचे उद्योगनगरीत उत्साहात स्वागत
राजेंद्रकृष्ण कापसे
आकुर्डी - सर्व संतांचे माहेर असलेल्या पंढरीच्या दिशेने निघालेला सोहळा मंगळवारी सकाळी देहूकरांचा निरोप घेत मार्गस्थ झाला. अनगडशहा बाबांच्या दर्ग्याजवळील आरती, तळपत्या उन्हातील वाटचाल, उद्यमनगरीत प्रवेश करताना झालेले जोषपूर्ण स्वागत, यामुळे वातावरण "तुकोबामय' झाले होते. हा सोहळा बुधवारी दुपारनंतर पुण्यनगरीत प्रवेश करणार आहे. तुका म्हणे पेठ ।भूमिवरी हे वैकुंठ ।।संतांच्या कुळात पंढरीची वारी हा गौरवाचा विषय समजला जातो. वारीबरोबर विठ्ठलाच्या भक्तीला एक वेगळे महत्त्व आहे. ही पंढरी सर्व संतांचे, भक्तांचे माहेर आहे. विठ्ठलाच्या आठवणीने भक्तांची अवस्था एखाद्या माहेरवाशिणीसारखीच होते. आजही याच ओढीने सर्व सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. देहूतील इनामदार वाड्यात पहाटे पादुकांची पूजा जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाली. काकड आरतीने दिवस सुरू झाला. भोसरी येथील वाडेकर बंधूंच्या वतीने सोहळ्याची सजावट करण्यात आली होती. देहूकरांच्या वतीने मान्यवरांनी सोहळ्यास निरोप दिला. सामाजिक ऐक्‍याचे प्रतीकदेहूकरांनी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यापर्यंत पालखी खांद्यावरून आणली. दर्ग्यासमोर संत तुकाराम महाराजांची आरती झाली. अनगडशहा बाबा हे तुकोबारायांचे शिष्य होते. त्यांच्या अभंगांनी व भक्तीने प्रेरित होऊन अनगडशहा बाबांनी त्यांचा अनुग्रह घेतला. त्याबाबत तुकाराम महाराजांनी "प्रसादाच्या धरणेकरी'चे किंवा अकरा अभंग सांगितले आहेत. यातील एक अभंग "चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती' आहे. अशा प्रकारे हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या गुरू-शिष्याच्या नात्याने मोठी शिकवण दिलेली आहे. आरतीनंतर पालखी चांदीच्या नव्या रथात ठेवण्यात आली. नंतर सोहळा पुढे मार्गस्थ झाला. देहूरोड छावणी जकात नाक्‍यामार्गे सोहळा पुढे सरकत होता. दुपारचा विसावा चिंचोली पादुका होता. तेथे आरती झाली. विसावा घेऊन सोहळा निगडीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास सोहळ्याने पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत प्रवेश केला. भक्ती-शक्ती चौकात महापौर अपर्णा डोके व महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांच्या हस्ते पादुकांवर पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत करण्यात आले. टिळक चौकात पालखीने विसावा घेतला. सहा वाजता सोहळा पुढे मार्गस्थ झाला. प्राधिकरण, दत्तवाडी, विठ्ठलवाडीमार्गे आकुर्डीतील गावठाणात पालखी पोचली. हा मार्ग रहिवासी वस्तीतील आहे. संध्याकाळी हरिपाठाचे अभंग सुरू होते. यामुळे येथील सारे वातावरण भक्तिमय झाले होते. सोहळा संथ गतीने विसाव्याच्या ठिकाणी मार्गस्थ झाला. दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा अनेक भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.संध्याकाळी सव्वासात वाजता सोहळा श्री विठ्ठल मंदिराजवळ आला. "हे माझे मिरासी, ठाव तुझे पायापाशी' हा अभंग होऊन आरती झाली आणि सोहळा मुक्कामासाठी विसावला. रात्री पालखीसमोर देशमुख दिंडीच्या वतीने कीर्तन करण्यात आले. माई दिंडीच्या वतीने जागर करण्यात आला. बुधवारी सकाळी सोहळा पुणे शहराकडे मार्गस्थ होईल.

तुकोबांची पालखी पुण्यनगरीत विसावली

राजेंद्रकृष्ण कापसे
पुणे - संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी रात्री नऊच्या सुमारास निवडुंग्या विठ्ठलमंदिरात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला. घेईन मी जन्म याजसाठी देवा।तुझी चरणसेवा साधावया।।या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे मनी भाव ठेवून वारकऱ्यांनी पिंपरी-चिंचवडहून वाटचालीस सुरवात केली. "उठा उठा पांडुरंगा...' या काकडी आरतीच्या अभंगांच्या स्वरांनी आकुर्डीकरांना जाग आली. संत तुकोबारायांच्या पादुकांची पूजा जयवंत कुटे व संस्थानचे सोहळा प्रमुख विश्‍वस्त विश्‍वजित मोरे यांच्या हस्ते झाली. पहाटेच पाच वाजता सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. सकाळी नऊ वाजता पहिल्या विश्रांतीसाठी सोहळा साडेसात ते नऊ वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील एचए कॉलनीत पोचला. त्यानंतर येथे व कासारवाडीत विश्रांती घेऊन सोहळा दुपारच्या जेवणासाठी दापोडीत पोचला. तासाभराच्या विश्रांतीनंतर खडकीमार्गे सोहळा पुण्याच्या दिशेने निघाला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोहळा वाकडेवाडी येथे आला. येथे महापालिकेच्या वतीने महापौर राजलक्ष्मी भोसले, उपमहापौर चंद्रकांत मोकाटे यांनी पादुकांवर हार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखीसोबत सोहळाप्रमुख बाळासाहेब मोरे, नितीन मोरे, संस्थानचे अध्यक्ष बापूसाहेब मोरे होते. महापालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नगरसेवक अनिल भोसले यांनी रथाचे सारथ्य केले. अनेक संस्थांनी वारकऱ्यांसाठी अन्नदानासह विविध उपक्रम राबविले. फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, लक्ष्मी रस्तामार्गे सोहळा नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात समाज आरतीनंतर विसावला. गुरुवारी दिवसभर सोहळा पुण्यात मुक्कामी असेल. शुक्रवारी (ता. १९) सोहळा लोणी काळभोरकडे मार्गस्थ होईल.

पुण्याचे कारागीर करताहेत माऊलींच्या रथाची सजावट

पुण्याचे कारागीर करताहेत माऊलींच्या रथाची सजावट
पंढरपूर - संत श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या रथाची आकर्षक पद्धतीने फुलांची सजावट मुंबईचे दहा पुष्परचनाकार गेल्या पंचवीस वर्षांपासून मोफत सेवा करीत आहेत.फुलांच्या सजावटीमुळे माऊलींचा रथ आकर्षक दिसतो. रथाच्या सजावटीसाठी सर्व प्रकारची मिळून सुमारे शंभर किलो फुले लागतात. सजावटीची सर्व फुले पुण्याहून आणली जातात. त्यासाठी खास वातानुकूलित वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.मुंबई व पुण्यामध्ये लग्न, स्वागत सोहळा व धार्मिक कार्यक्रमात पुष्परचना करणारे कारागीर पालखी सोहळ्यात सहभागी होतात.पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोचताच त्यांची लगबग सुरू होते.आज कोणत्या प्रकारचे तोरण करायचे हे सर्वानुमते ठरताच पटापट फुले गुंफण्यास सुरवात होते.याबाबत बोलताना पुष्परचनाकार चंद्रकांत गावडे म्हणाले, ""आम्ही गेल्या पंचवीस वर्षांपासून माऊलींची सेवा करतोय.रथाच्या सजावटीसाठी लागणारी सर्व फुले आळंदीचे नगराध्यक्ष नानासाहेब गरुड हे स्वतः आणतात. रात्री सात वाजल्यापासून पहाटे पाचपर्यंत आमचे काम चालते. फुलांच्या माळा करण्यासाठी सुमारे पाच तास लागतात. त्यानंतर तोरण गुंफायला घेतो. ते काम खूप नाजूक असल्याने त्यास अधिक वेळ लागतो. किलवर, नेकलेस, गोपद्म, शकुंबरबाबा, बैलमुत्या, एलिफंटा, झालर या प्रकारच्या फुलांची तोरणं आम्ही करतो. रोज नवनवीन प्रकारच्या तोरणांनी माऊलींचा रथ आम्ही सजवतो. रथ सजविण्यासाठी 20 किलो झेंडूची फुले, कारनेशनच्या 25 पेंड्या, 400 पेंड्या लिली, 100 पेंड्या जरबेरा, 50 पेंड्या गुलाब, दोन किलो मोगऱ्याची फुले, अशोक पाला, तुळशीच्या दहा पेंड्या आम्ही वापरतो.''बंडू ठाकूर, प्रकाश ठाकूर, कैलास आवटे, दशरथ गोडसे, कुमार लोंढे, हरी गोडसे, मनोहर शिंदे, शिवाजी साबळे, विठ्ठल सावंत हे पुण्यातील पुष्परचनाकर माऊलींची सेवा करीत आहेत.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
राजेंद्रकृष्ण कापसे

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे प्रदक्षिणेदरम्यान देऊळवाडा येथे घेतलेले छायाचित्र (छायाचित्र - विश्‍वनाथ गरूड, ई-सकाळ)
देहू - तळपत्या उन्हातही देहूनगरीत नामघोषात दंग वारकरी... सर्वत्र सुरू असलेला वीणेचा झंकार... टाळांचा अखंड गजर व तुकोबारायांचा जयघोष...अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सायंकाळी चार वाजता येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. त्यानंतर हा पालखी सोहळा प्रदक्षिणा मार्गाने देहूतील इनामदार वाड्यात मुक्कामासाठी विसावला. उद्या (ता. १६) सकाळी तो पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे.आमुचि मिरास पंढरी ।आमुचे घर भीमातीरी ।। अशा अभंगाच्या घोषात सोमवारी पहाटे विठ्ठल-रुक्‍मिणी व शिळामंदिरात महापूजा करण्यात आली. सकाळी नऊ वाजता बापू महाराज देशमुख यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यांनी या वेळी "उपजोनि पुढती येऊ, काला खाऊ दही-भात' हा अभंग कीर्तनासाठी घेतला होता. दुपारी अडीच वाजता प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. वीणामंडपात मान्यवर, विणेकरी व मानकरी उपस्थित होते. मावळचे खासदार गजानन बाबर व मानाचे वारकरी लक्ष्मण गंगाराम देशमुख (रा. चिलची वाडी, पंढरपूर) यांच्या हस्ते तुकोबारायांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. देशमुख हे तीस वर्षांपासून वारीत सहभागी होत आहेत.संस्थानचे अध्यक्ष सोनबा मोरे, सोहळाप्रमुख सूर्यकांत मोरे, संजय मोरे, राजेंद्र मोरे, विश्‍वस्त पंढरीनाथ मोरे, विश्‍वजित मोरे, नितीन मोरे आदी या वेळी पूजेला बसले होते. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, पिंपरी-चिंचवडच्या महापौर अपर्णा डोके, प्रतिभा पाचपुते, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, पोलिस अधीक्षक रवींद्र कदम, प्रांताधिकारी जयश्री कटारे, तहसीलदार विजय पाटील, सभापती प्रभावती भूमकर, वारकरी, फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष भानुदास ढवळीकर, देहूच्या सरपंच शुभांगी मोरे, उपसरपंच प्रकाश हगवणे या प्रसंगी उपस्थित होते. कोथरूडचे ग्रामोपाध्याय सुभाष टांकसाळे यांनी महापूजेचे पौरोहित्य केले. तीन वाजता आरती झाली. त्यानंतर "पुंडलिक वरदे' व संत तुकाराम महाराजांच्या जयघोषात सोहळ्यासाठी पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. त्यानंतर पालखी वीणामंडपातून बाहेर येऊन, राऊळवाड्यात मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. दरम्यान, विठ्ठलनामाच्या ठेक्‍यावर वारकऱ्यांचे विविध खेळ भर उन्हात रंगले होते. टाळ, पखवाज, वीणा-चिपळ्यांच्या तालावर मनोरे, फुगड्या, झिम्मा, फेर, कोंबडा फुगडी, बैठी फुगडी असे खेळ खेळण्यात आले. खेळात दंग झालेल्या वारकऱ्यांच्या अंगातून उन्हामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. त्यानंतर प्रदक्षिणा मार्गाने सोहळा देहूतील इनामदार वाड्यात मुक्कामासाठी विसावला. उद्या (ता. १६) सकाळी सोहळा आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे.चर्चा पेरणीची, पावसाचीपालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी 'श्रीं'चे दर्शन घेऊन मंदिरात, नदीकाठी बसलेल्या राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये चर्चा होती ती पेरण्या खोळंबल्याची; पावसाने ओढ दिल्याची. 'मृग नक्षत्र कोरडे गेले. पावसाचा टिपूसही पडला नाही. पेरण्या खोळंबल्या आहेत. धूळवाफ पेरणी झाली; पण, पाऊस नसल्याने दुबार पेरणी करावी लागणार....' अशी चर्चा वारकऱ्यांत सुरू होती. परंतु, पेरण्या, पाऊस यांची चिंता विठ्ठलावर सोपवून वारकरी पुन्हा प्रस्थान सोहळ्यात दंग झाले.

तुकोबांचा सोहळा विसावला नीराकाठी

राजेंद्रकृष्ण कापसेसराटी - पंढरीच्या वाटेवरील एकूण तेराव्या व पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी तुकोबांचा पालखी सोहळा सराटी येथे शनिवारी संध्याकाळी पोचला. सोहळा रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत असून, तिसरे व शेवटचे गोल रिंगण अकलूज येथे होणार आहे. पहाटे पाच वाजता विश्‍वस्त विश्‍वजित मोरे यांनी काकड आरती घेतली. त्यानंतर नगराध्यक्षा विद्या महाजन, बंडोपंत वाघ, शहा, ठाकूर परिवाराच्या वतीने पूजा झाली. शनिवारी रात्री कीर्तन धोंडोपंत दादा दिंडीच्या वतीने, तर जागर केसापुरीकर यांच्या वतीने झाला. गोकुळीचा ओढा (विठ्ठलवाडी), वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती येथे काही वेळांची विश्रांती घेतली. सकाळची वाटचाल आल्हाददायक वातावरणात झाली. तरी दुपारनंतरचे तळपते ऊन, जोराचा वारा यामुळे वारकऱ्यांची दमछाक होत होती. दुपारच्या जेवणासाठी सोहळा बावडा येथे पोचला. या वेळी सहकार व सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम सुरू झाला. या वेळी पाटील कुटुंबाच्या वतीने संस्थानचे अध्यक्ष सोनबा मोरे, सोहळाप्रमुख सूर्यकांत मोरे, संजय मोरे, राजेंद्र मोरे यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यंदाचा सोहळा 18 दिवसांचा आहे. त्यातील 13व्या दिवसासाठी सोहळा आज विसावला. आता उरले अवघे पाच मुक्काम. प्रत्येक दिंडीत आता वारकऱ्यांची संख्याही वाढत आहे. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वारकऱ्यांची रांग पोचली आहे. आज नीरास्नान व गोल रिंगणरविवारी सकाळी नीरा नदीत पादुकांना विश्‍वस्तांच्या हस्ते स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर अकलूज येथील सदाशिव माने प्रशालेच्या मैदानावर सकाळी तिसरा गोल रिंगण सोहळा होणार आहे. सोहळा अकलूज येथेच विसावणार आहे.
सराटी - पंढरीच्या वाटेवरील एकूण तेराव्या व पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी तुकोबांचा पालखी सोहळा सराटी येथे शनिवारी संध्याकाळी पोचला. सोहळा रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत असून, तिसरे व शेवटचे गोल रिंगण अकलूज येथे होणार आहे. पहाटे पाच वाजता विश्‍वस्त विश्‍वजित मोरे यांनी काकड आरती घेतली. त्यानंतर नगराध्यक्षा विद्या महाजन, बंडोपंत वाघ, शहा, ठाकूर परिवाराच्या वतीने पूजा झाली. शनिवारी रात्री कीर्तन धोंडोपंत दादा दिंडीच्या वतीने, तर जागर केसापुरीकर यांच्या वतीने झाला. गोकुळीचा ओढा (विठ्ठलवाडी), वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती येथे काही वेळांची विश्रांती घेतली. सकाळची वाटचाल आल्हाददायक वातावरणात झाली. तरी दुपारनंतरचे तळपते ऊन, जोराचा वारा यामुळे वारकऱ्यांची दमछाक होत होती. दुपारच्या जेवणासाठी सोहळा बावडा येथे पोचला. या वेळी सहकार व सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम सुरू झाला. या वेळी पाटील कुटुंबाच्या वतीने संस्थानचे अध्यक्ष सोनबा मोरे, सोहळाप्रमुख सूर्यकांत मोरे, संजय मोरे, राजेंद्र मोरे यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यंदाचा सोहळा 18 दिवसांचा आहे. त्यातील 13व्या दिवसासाठी सोहळा आज विसावला. आता उरले अवघे पाच मुक्काम. प्रत्येक दिंडीत आता वारकऱ्यांची संख्याही वाढत आहे. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वारकऱ्यांची रांग पोचली आहे. आज नीरास्नान व गोल रिंगणरविवारी सकाळी नीरा नदीत पादुकांना विश्‍वस्तांच्या हस्ते स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर अकलूज येथील सदाशिव माने प्रशालेच्या मैदानावर सकाळी तिसरा गोल रिंगण सोहळा होणार आहे. सोहळा अकलूज येथेच विसावणार आहे.

Thursday, June 25, 2009

सणसर - काटेवाडीत धोतरांच्या पायघड्यांतून परिटांनी पंढरीची वाट सजविली, तर मेंढ्यांनी तुकोबांच्या पालखीला प्रदक्षिणा घातली. भक्तांच्या उत्साही वातावरणात तुकोबांचा सोहळा सणसर मुक्कामी पोचला. दरम्यान, बारामतीतील पहाटपूजा नगराध्यक्षा मंगल सराफ व एकनाथ काटे यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाली. सकाळपासूनच सूर्याच्या प्रखर किरणांमुळे वारकऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा टपकत होत्या. अशा चिंब झालेल्या वातावरणातच सोहळ्याचे मार्गक्रमण सुरू आहे. पिंपळी, लिमटेक येथील विसावा घेत सोहळा पुढे पुढे सरकत होता. सव्वाबारा वाजण्याचा सुमारास सोहळा काटेवाडीच्या वेशीवर पोचला. येथे सरपंच मीनाक्षी देवकाते, उपसरपंच रेवती गायकवाड, प्रशांत काटे, एकनाथ काटे, अनिल काटे, महादेव कचरे, संजय काटे, शिवाजी काटे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. इंदापूर रस्त्यावरील कमानीजवळ रथ आला. त्यातून पालखी ग्रामस्थांनी खांद्यावर घेतली. लगेचच परीट बंधूंनी धोतराच्या पायघड्या घालण्यास सुरवात केली. या अनोख्या स्वागताने वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. पालखी कट्टा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजविला होता. आरतीनंतर पालखी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दीड तासाच्या विसाव्याने सोहळा तीनच्या सुमारास मार्गस्थ झाला. इंदापूर तालुक्‍याच्या वतीने तहसीलदार श्रीपती मोरे, सभापती रमेश जाधव, सणसरचे सरपंच विजयसिंह निंबाळकर यांनी स्वागत केले. सणसर येथे सोहळ्यात रात्री पैठणकर दिंडीच्या वतीने कीर्तन तर कानसूरकर दिंडीच्या वतीने जागर करण्यात आला. साडेपाचशे मेंढ्यांचे रिंगणकाटेवाडीगावातून सोहळा इंदापूर रस्त्यावर आला. येथे साडेपाचशे मेंढ्यांनी सव्वातीनच्या सुमारास रथास प्रदक्षिणा घातली. मुक्‍या प्राण्यांची भक्ती पाहण्यासाठी सोहळ्यातील अनेक भाविकांनी गर्दी केली होती. यंदा अनेक वाहिन्यांनी या घटनेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी गर्दी केली होती. भक्तिरंगातील अशा विविध रंगांनी बुधवारची वाटचाल सुखकर झाली. भवानीनगर येथे सोहळा बारामतीतून इंदापूर तालुक्‍यात आला. बेलवडी येथे गुरुवारी सकाळी यंदाच्या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोहळा होणार आहे.सेवा रुजू व्हावी हेच मागणे"पायघड्या टाकण्याची रीत म्हणजे अगत्याने स्वागत करणे. परंपरा जुनी असून, पूर्वी घराघरांतून धोतर एकत्र करीत होतो. परंतु कालांतराने पायघड्यांसाठी आम्ही स्वतंत्र धोतर जोड खरेदी करतो. त्यांचा वापर फक्त पायघड्यांसाठी केला जातो. ती फक्त पालखी येण्यापूर्वी परीट समाजाच्या ताब्यात दिली जातात.'' असे काटेवाडीतील स्वागतप्रमुख पंढरीनाथ काटे यांनी सांगितले, तर "मेंढ्या तुकोबांच्या रथाभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यामुळे आमच्या मेंढ्यांना रोगराई होत नाही. तसेच तुकोबांच्या चरणी ही सेवा आम्ही अपर्ण करतो,'' असे संभाजी मारुती काळे व तात्या बाबूराव म्हासाळ यांनी सांगितले.









धोतराच्या पायघड्यांनी सजली पंढरीची वाट

राजेंद्रकृष्ण कापसे
सणसर - काटेवाडीत धोतरांच्या पायघड्यांतून परिटांनी पंढरीची वाट सजविली, तर मेंढ्यांनी तुकोबांच्या पालखीला प्रदक्षिणा घातली। भक्तांच्या उत्साही वातावरणात तुकोबांचा सोहळा सणसर मुक्कामी पोचला। दरम्यान, बारामतीतील पहाटपूजा नगराध्यक्षा मंगल सराफ व एकनाथ काटे यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाली. सकाळपासूनच सूर्याच्या प्रखर किरणांमुळे वारकऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा टपकत होत्या. अशा चिंब झालेल्या वातावरणातच सोहळ्याचे मार्गक्रमण सुरू आहे. पिंपळी, लिमटेक येथील विसावा घेत सोहळा पुढे पुढे सरकत होता. सव्वाबारा वाजण्याचा सुमारास सोहळा काटेवाडीच्या वेशीवर पोचला. येथे सरपंच मीनाक्षी देवकाते, उपसरपंच रेवती गायकवाड, प्रशांत काटे, एकनाथ काटे, अनिल काटे, महादेव कचरे, संजय काटे, शिवाजी काटे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. इंदापूर रस्त्यावरील कमानीजवळ रथ आला. त्यातून पालखी ग्रामस्थांनी खांद्यावर घेतली. लगेचच परीट बंधूंनी धोतराच्या पायघड्या घालण्यास सुरवात केली. या अनोख्या स्वागताने वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. पालखी कट्टा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजविला होता. आरतीनंतर पालखी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दीड तासाच्या विसाव्याने सोहळा तीनच्या सुमारास मार्गस्थ झाला. इंदापूर तालुक्‍याच्या वतीने तहसीलदार श्रीपती मोरे, सभापती रमेश जाधव, सणसरचे सरपंच विजयसिंह निंबाळकर यांनी स्वागत केले. सणसर येथे सोहळ्यात रात्री पैठणकर दिंडीच्या वतीने कीर्तन तर कानसूरकर दिंडीच्या वतीने जागर करण्यात आला. साडेपाचशे मेंढ्यांचे रिंगणकाटेवाडीगावातून सोहळा इंदापूर रस्त्यावर आला. येथे साडेपाचशे मेंढ्यांनी सव्वातीनच्या सुमारास रथास प्रदक्षिणा घातली. मुक्‍या प्राण्यांची भक्ती पाहण्यासाठी सोहळ्यातील अनेक भाविकांनी गर्दी केली होती. यंदा अनेक वाहिन्यांनी या घटनेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी गर्दी केली होती. भक्तिरंगातील अशा विविध रंगांनी बुधवारची वाटचाल सुखकर झाली. भवानीनगर येथे सोहळा बारामतीतून इंदापूर तालुक्‍यात आला. बेलवडी येथे गुरुवारी सकाळी यंदाच्या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोहळा होणार आहे.सेवा रुजू व्हावी हेच मागणे"पायघड्या टाकण्याची रीत म्हणजे अगत्याने स्वागत करणे. परंपरा जुनी असून, पूर्वी घराघरांतून धोतर एकत्र करीत होतो. परंतु कालांतराने पायघड्यांसाठी आम्ही स्वतंत्र धोतर जोड खरेदी करतो. त्यांचा वापर फक्त पायघड्यांसाठी केला जातो. ती फक्त पालखी येण्यापूर्वी परीट समाजाच्या ताब्यात दिली जातात.'' असे काटेवाडीतील स्वागतप्रमुख पंढरीनाथ काटे यांनी सांगितले, तर "मेंढ्या तुकोबांच्या रथाभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यामुळे आमच्या मेंढ्यांना रोगराई होत नाही. तसेच तुकोबांच्या चरणी ही सेवा आम्ही अपर्ण करतो,'' असे संभाजी मारुती काळे व तात्या बाबूराव म्हासाळ यांनी सांगितले.

हरिनामाच्या छंदात तुकोबा पालखी सोहळा निमगाव केतकीत विसावला

हरिनामाच्या छंदात तुकोबा पालखी सोहळा निमगाव केतकीत विसावला
राजेंद्रकृष्ण कापसे
निमगावकेतकी - बेलवडीतील पहिले गोल रिंगण... रिंगणानंतरची विश्रांती, तिथीचा क्षय झाल्यामुळे एक मुक्काम रद्द झाला. त्यामुळे वाढलेली वाटचाल, पर्यायाने थकलेले पाय, तरीदेखील हरिनामाच्या छंदात दंग झालेला सोहळा शुक्रवारी रात्री नऊ वाजता निमगाव केतकीत विसावला. शनिवारी सकाळी इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे.सोहळ्यातील पहिले रिंगण होणार असल्याने पहाटेपासूनच वैष्णवांची लगबग सुरू होती. ग्रामस्थांनी रिंगणाचे मैदान पूर्वीच आखून ठेवले होते. रिंगण सोहळा भक्तीचा हा अनोखा सोहळा टिपण्यासाठी परिसरातील गावातील भाविकांनी गर्दी केली होती. संस्थानचे अध्यक्ष सोनबा मोरे, माजी अध्यक्ष बापूसाहेब देहूकर यांनी चोपदारांना रिंगण लावण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे निवृत्ती, नामदेव, कानसूरकर, देशमुख, खैरे, शिवाजी गिराम या चोपदारांनी रिंगण लावून घेतले. तसेच सोहळाप्रमुख संजय मोरे, सूर्यकांत मोरे, राजेंद्र मोरे विश्‍वस्त विश्‍वजित मोरे, नितीन मोरे, विश्‍वस्त हे या वेळी उपस्थित होते. प्रथम बाभूळगावकरांच्या अश्‍वावर संत तुकाराम महाराज आरूढ आहेत तो अश्‍व रिंगणात आणला. त्याने दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. नंतर मोहिते-पाटलांचा स्वाराचा अश्‍व रिंगणात आला. त्यानेही वेगात दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. दोन्ही अश्‍व पालखीच्या दिशेने आत आले. त्यानंतर नामदेव चोपदारांनी टाळकरी व पखवाजवादकांना उडीचे निमंत्रण दिले. पालखीभोवती टाळकरी व पखवाजवादकांचा "तुकाराम तुकाराम'चा ठेका सुरू झाला. यातही टाळकरी लयबद्ध हालचाली करीत होते, तसेच विविधध्ये आटापाट्या, फुगड्या, झिम्मा, फेर, कोंबडा फुगडी, बैठी फुगडी, काठवट असे खेळ रंगले होते. रथाची सजावट अविनाश घोलप यांच्या वतीने करण्यात आली होती. राजेशिर्के व निंबाळकर कुटुंबीयांच्या वतीने पादुकांची पूजा करण्यात आली. यंदा तिथीचा क्षय झाला. यामुळे लासुर्णेऐवजी निमगाव केतकीला मुक्काम करण्यात आला. दरम्यान, दर वर्षी 18 किलोमीटर जादा अंतराची वाटचाल वारकऱ्यांना करावी लागली. सोहळा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास निमगावकडे मार्गस्थ झाला. रात्री नऊ वाजता समाजआरतीनंतर सोहळा मुक्कामी विसावला. येथील अनेक शेतकऱ्यांनी नागवेली (पानविडा)ची पाने वारकऱ्यांना वाटली. हा परिसर नागवेलीच्या पानांचे उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज दुसरे गोल रिंगणइंदापूर येथील शाळेच्या पटांगणावर शनिवारी दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा होणार आहे. त्यासाठी नगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे.
जय SHIVAJI