Sunday, June 28, 2009

अकलूजला पार पडलं तिसरं गोल रिंगण


अकलूजला पार पडलं तिसरं गोल रिंगण


संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं तिसरं रिंगण आज पार पडलं। अकलूज - इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या आवारात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं तिसरं आणि शेवटचं गोल रिंगण आज (ता.२८) पार पडलं. तत्पूर्वी, जिल्ह्याचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सपत्निक आणि सरपंच संग्रामसिंह मोहिते यांनी अकलूजमध्ये स्वागत केलं. संपूर्ण पालखी सोहळ्यातलं आखीव, रेखीव आणि नेटकं व्यवस्थापन असणारं हे गोल रिंगण पाहण्यासाठी राज्यातून अनेक भाविक, अभ्यासक, आवर्जून उपस्थित राहतात. या गोल रिंगणानंतर होणारे संत खेळ खेळण्यात आणि पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. टाळकरी, पखवाजवादक आदी भाविक तसंच डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी चोपदारांच्या सुचनेनुसार तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्याचवेळी अचानक मोहिते पाटील यांचा आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा अश्व रिंगण तोडून बाहेर पडले. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय अन्य तीन ते चार वारकरी किरकोळ जखमी झाले. भक्तनिवासासाठी एक कोटीदेहूतल्या भक्तनिवासासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज इथं केली. त्यासाठीची प्रक्रिया १५ दिवसांत सुरु करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment